जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिशोर येथे आमदार संजना जाधव यांनी लोकशाहीच्या महापर्वात सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मतदान हा लोकशाहीचा कणा असून तो प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. निर्भयपणे व उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.