महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व गृहराज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर यांचे गोंदिया आगमनानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. अनेक शाळांमध्ये विषय शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अध्यापनाची गुणवत्ता देखील घसरत आहे.