चंद्रपूर जिल्ह्यातील कवडशी देश परिसरात शेषराव झाडे यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने ४० वनकर्मचाऱ्यांची चार विशेष पथके गठित केली आहेत. तर ज्या ठिकाणी वाघाने हल्ला केला त्या परिसरात १२ ट्रॅप कॅमेरे, लाइव्ह कॅमेरे बसविले असल्याची माहिती वनविभागाने दिली.