चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) स्ट्राँगरूममध्ये कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार असल्यामुळे या ठिकाणी २४ तास कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.दरम्यान, मंगळवारी अचानक स्ट्राँगरूममधील सायरन वाजू लागल्याने काही क्षण परिसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या जवानांची अक्षरशः धावपळ उडाली.