शहरातील गौरीनगर येथील मैदानातील कोपऱ्यात असलेल्या करंजीच्या झाडाला गळफास घेऊन दिलीप सोहनलाल चौधरी (५८) या व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१४) सायंकाळी ४:३० वाजता दरम्यान घडली. त्यांच्या आत्महत्येमागील मागील कारण कळू शकले नाही. रमन दिलीप चौधरी (२७) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार शेख करीत आहेत.