शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा. खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारला (ता.०३) लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले असून, १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.या आंदोलनात साकोलीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले