कारंजा शहरांमध्ये एक ते दीड वर्षापासून बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क ग्राहकांना नियमित मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता यादव यांना आज दिली आहे बीएसएनएलचे टावर दीड वर्षापासून बंद असल्यामुळे त्याचा शोध घेऊन तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती