येथील सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी आणि शेतकरी आयटीआंदोलक विजय ढाले यांची सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे.त्यांच्या 'बिब्बा' या पहिल्या काव्यसंग्रहाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी त्यांनी ९२ वे (यवतमाळ), ९४ वे (नाशिक), आणि ९६ वे (वर्धा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही सहभाग नोंदवला आहे. साहित्य क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात, विशेषतः शेतकरी आंदोलनात ते सक्रिय आहेत. ढाले या