तेल्हारा तालुक्यातील बाभुळगाव शेतशिवारात बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हालचालीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गरज नसताना शेतात जाणे टाळावे, मोबाईल किंवा लाटीचा वापर करावा, तसेच सायंकाळपूर्वीच सर्व शेतीची कामे उरकून घरी परतावे असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.