समुद्रपूर: गिरड येथील शेतकऱ्याने ऐन लश्रीपुजनाच्या दिवसी ९ एकरातील सोयाबीनच्या कापणी केलेल्या पिकाला लावली आग
गिरड येथील शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याने पिक येणार नाही मळणीचा खर्च सुध्दा निघणार नाही या भिती पोटी लश्रीपुजनाच्या दिवसी ९ एकरातील सोयबीनच्या पिकाला कापून चक्क स्वताच्या हाताने आग लावून आगीच्या स्वाधीन केले. गिरड येथील शेतकरी राजेंद्र गिरड यांनी आपल्या ९ एकर शेतीमध्ये सोयबीनची पेरणी केली सोयबीन पिका चांगले उत्पादन येण्यासाठी चांगल्या प्रतीचे रासायनिक खते दिले, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच महागड्या किटकनाशकांची फवारणी सुध्दा केली