कोल्हापुरातील शंभर कोटी खराब रस्त्यांच्या विरोधात आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज कोल्हापूर महापालिकेसमोर जवाब दो या चले जाओ आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर शहरात रस्त्यांची प्रचंड दुरावस्था असून महापालिका प्रशासक याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच आपल्या जबाबदारी पासून दूर पळण्याचा प्रयत्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे.