येत्या 26 एप्रिलला ला होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने,जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मतदारांची जनजागृती करण्यात आली.आज सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पांगरी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली,या फेरीत मतदान करा,मतदान करा 26 तारखेला मतदान करा,मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो, या घोषणा लिहलेले फलक हातात घेऊन घोषणा देत तसेच गीत गाऊन गावात जागोजागी मतदार जनजागृती करण्यात आली.