लहान आर्वी येथील अतिवृष्टीने झालेल्या संत्राबागांची व शेताची नुकसानीची खासदार श्री. अमर काळे यांनी पाहणी केली व मा. जिल्हाधिकारी हयांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार महसुल व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा 13 कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनास सादर करण्यात आला आहे.