ऋषिपंचमीचे औचित्य साधून गुरुवार २८ ऑगष्ट रोजी तालुक्यातील येवती डोंगर वर्धा नदीवर अंघोळीसाठी महिला भाविकांनी पहाटे ६ वाजेपासून भव्य गर्दी केली होती. नदी काठावर महिला विधिवत पूजाविधी करताना दिसल्या. वर्धा नदीच्या पवित्र जलाने स्नान केल्यानंतर महिलांनी काठावर बसून ऋषीची पूजा करून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.