लातूर : तालुक्यातील लामजना (औसा) व कोकळ (निलंगा) परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता भेट देऊन पिकांची पाहणी केली.या पाहणीवेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्रीशैल उटगे, शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी तसेच शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे उपस्थित होत्या.