जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक,चारकोल रॉट,सारख्या विविध रोगांमुळे उत्पादन धोक्यात आले आहे. त्यामुळे पवनार येथील शेतकऱ्यांनी करपलेले, पिवळे पडलेले आणि शेंगाविना राहिलेले सोयाबीन हातात घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.