साडेतीन पवित्र पिकांपैकी एक असलेले राक्षसभुवन शनी मंदिर आज पुन्हा एकदा पुराच्या तडाख्यात सापडले असून हे मंदिर पाण्याखाली गेले आहे. नाशिक आणि धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून जवळपास १ लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून, राक्षसभुवनसह गोदाकाठची अनेक गावे जलमय झाली आहेत. काही गावांचा तर पूर्णतः संपर्क तुटलेला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु असले तरी पुरस्थिती गंभीर आहे.