Download Now Banner

This browser does not support the video element.

गेवराई: गोदावरी नदीला पूर आल्याने राक्षसभुवन येथील शनी मंदिराला पाण्याने वेढले, भाविकांना जाण्यासाठी प्रशासनाने केली बंदी

Georai, Beed | Aug 23, 2025
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील प्राचीन शनी मंदिर पाण्याखाली गेले आहे. नाथसागर अर्थात जायकवाडी धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने वाढला. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे तब्बल 18 दरवाजे उघडले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us