Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी सातारा विभागातून २०५ बसेस रवाना; ग्रामीण भागातील वेळापत्रक होणार विस्कळीत

Satara, Satara | Sep 2, 2025
कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून परत मुंबईला नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडून २०५ बसेस मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यासाठी २० चालक कम वाहक देखील पाठविण्यात आले आहेत. सातारा विभागीय कार्यालयातून सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार सातारा विभागातून एकूण २०५ बसेस रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, लांजा, राजापूर आणि मंडणगड आगारात पोहोचणार आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us