Download Now Banner

This browser does not support the video element.

सुधागड: त्या काळरात्रीला झाली 36 वर्षे पूर्ण 1989 च्या महापुरातील मृतांना जांभुळपाडा स्मृतिस्तंभ जवळ श्रद्धांजली अर्पण

Sudhagad, Raigad | Jul 24, 2025
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा अंबा नदीला 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला होता. या महापुराला गुरुवारी (ता.24) 36 वर्षे पुर्ण झाली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या महापुरात गतप्राण झालेल्या 80 ग्रामस्थांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणुन बांधण्यात आलेल्या स्मृती स्तंभाला ग्रामस्थ, शासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. दुर्दैवाचे दशावतार काय असतात आणि एका रात्रीत महाप्रलयाचे तांडव किती भयानक असू शकते याचा प्रत्यय 36 वर्षापूर्वी आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us