शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना व राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.यामुळे नृसिंहवाडी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरामध्ये बुधवार,दिनांक २५ जून रोजी दुपारी १ वाजता या वर्षीचा पहिला दक्षिण द्वार सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला.मात्र,मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.