मंगरूळ या गावातील रहिवाशी अंजली कुंदन पाटील वय १९ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली होती की मी चोपडा शहरात महाविद्यालयात जात आहे. दरम्यान असे सांगून घरून निघालेली ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. नातेवाईकांकडे तपास केला. मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून अडावद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.