चोपडा तालुक्यात अडावद हे गाव आहे. या गावात चामुंडा नगर आहे. या नगरात विजय भगवान माळी वय २२ हा तरुण आपल्या घरी होता या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.