महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी केले आहे. मंगळवार 9 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारच्या सुमारास श्री व्यंकटेश मंगल कार्यालय परभणी येथे जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरी