कुरुंदवाड शहर व परिसरात अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत विविध गणेश मंडळे तसेच घरगुती गणरायाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडले.झांज पथक,बँड पथक, बँजो आदी वाद्यांच्या गजरात नागरिकांनी बाप्पाला निरोप दिला.पोलीस प्रशासनाच्या परवानगीने शहरात नवनवीन कलापथके,गीत-संगीत व महामानवांच्या जन्मोत्सवांवर आधारित एकांकिका सादर करण्यात आल्या.