पंचगंगा नदीला पूर आला असून,आज शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हेरवाड गावाच्या वेशीत पाणी शिरले आहे.अब्दुल लाट मार्गावरील सुतार वस्ती, सांस्कृतिक भवन परिसराची उत्तरेकडील बाजू, घोसरवाड मार्गावरील नेर्ले मळा व कन्या शाळेच्या मागील इटाज गल्ली या भागांतील १५ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.कुरुंदवाड मार्गावरील आर.बी. पेट्रोलियम मागील भाग, विजय धाबा परिसरात पाणी घुसले आहे.नदीलगत असलेले स्वामी व जोंधळे यांचे मळे पाण्याखाली गेले आहेत.