नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मेहकर-लोणार मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रश्नावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले. ‘मागेल त्याला सौर पंप योजना’ यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी अधिवेशनात ठामपणे मांडली.