42 वर्षाची महिला दोन महिन्यांपासून पोटात दुखण्याच्या त्रासाने त्रस्त होते. सोनोग्राफी केली त्यावेळेस समजले की गर्भ पिशवी जवळ खूप मोठी गाठ असून, त्यामुळे पोटदुखीचा असह्य असा त्रास होत आहे. त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयात अगोदर उपचार केले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी या महिलेच्या नातेवाईकांनी देऊळगाव माळीचे सुपुत्र डॉ.अविनाश सुरुशे संजीवनी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जालना येथे आपली सेवा बजावतात. यांच्याकडे त्या पेशंट महिलेला उपचाराकरिता आणले. त्यावेळी हॉस्पिटलच्या सर्व टीमने त्या महिलेच्या योग्य तपासण्या करून ऑपरेशनचा खूप मोठा निर्णय घेतला की, तो अशक्य असा होता. परंतु त्यांनी हार न मानता त्या महिलेवर योग्य उपचार करून तब्बल तीन तासांच्या ऑपरेशन नंतर तब्बल सहा किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले.