जालना: जालना तालुक्यातील उटवद येथे अतिवृष्टी, रोगराईमुळे कापूस उत्पादन घटले,एकरी केवळ 3 ते 4 क्विंटल कापूस
जालना तालुक्यातील उटवद येथे अतिवृष्टी, रोगराईमुळे कापूस उत्पादन घटले,एकरी केवळ 3 ते 4 क्विंटल कापूस आज दिनांक 11 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरात यंदा कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. उटवद परिसरात शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. मात्र, वेचणीच्या काळात अतिवृष्टी आणि रोगराईमुळे उत्पादन घटले. कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी