वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गेवराई तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जन सुरक्षा कायदा रद्द करणे, गायरान धारकांना तात्काळ ७/१२ देणे, शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती, आवास योजनांचे प्रलंबित हप्ते देणे, निराधार योजनांचे मानधन वाढवणे, अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, दलित वस्तीतील रस्ते-नाले, वीज पोल, स्मशानभूमी व बौद्ध विहारासाठी जागा, रोजगार हमी योजनेतील कामे, सुशिक्षित बेरोजगारांना एमआयडीसी, तसेच प्रलंबित रेल्वे प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली