म्हणायला राष्ट्रीय महामार्ग मात्र खचगळी वाट, रस्त्यावर उडणा-या धुळीचे लोट, भलेमोठे खड्डे, तर पावसाळ्यात या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना आलेले डबक्याचे स्वरुप, यातून वाट काढतांना वाहनधारकांची होणारी कसरत, अपघाताचे वाढते सत्र, आदींमुळे सर्वसामान्य प्रवाशांची अक्षरश: होणारी कुचंबणा. अशी गंभीर स्थिती आष्टी-सिरोंचा या 140 किमी मार्गाची झाली आहे़ या रस्त्याकडे प्रशासकीय यंत्रणेने कानाडोळा केल्याने रस्त्याची चाळण झाली आहे़.