पुणे : शिवाजी रोडवरील राष्ट्रभूषण चौकात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील पांगरी गावचा रहिवासी बळीराम साहेबराव चव्हाण (वय २१) हा दुचाकीवरून जात असताना अज्ञात कारचालकाने वेग मर्यादा व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेपर्वाईने कार चालवली. भरधाव कारने बळीराम यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले