बीड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न बालाघाट डोंगररांगा महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संगनमताने चालणाऱ्या गौण खनिज माफियांच्या अवैध उत्खननामुळे पोखरून नष्ट होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी यांच्याकडून सातत्याने तक्रारी होऊनही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. त्यांनी पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांनी तातडीने हस्तक्षेप करून बालाघाट डोंगररांगा वाचवाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.