भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील नागरिकांच्या शासन आणि प्रशासन स्तरावरील प्रलंबित कामकाजाचे तातडीने निवारण करण्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भंडारा जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये तालुकास्तरीय जनता दरबार आयोजित करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये सर्व तहसील मुख्यालयावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार यशस्वीपणे पार पडले.