महागाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरी व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप मोबदला मिळालेला नाही. खरे नुकसानग्रस्त वंचित राहू नयेत यासाठी शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, महागाव येथे अर्ज भरून घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान केले आहे.