15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्या वतीने करण्यात आली,सरकार 15 मार्च 2024 च्या शासन निर्णय लावून अनपड व बेरोजगार पिढी निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप या आंदोलनातून करण्यात आला,मराठी शाळा संपवणारा व गोरगरिबांचे शिक्षण हिरावून घेणारा शासन निर्णय असल्याचा आरोप करत रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी या आंदोलनातून केली आहे,यावेळी मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.