वैराग परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी २९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संवाद साधला. मदतीसाठी धान्य, कडधान्ये, खाद्यतेल, डाळी आदी वस्तू १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये जमा कराव्यात, त्यापासून तयार करण्यात येणारी किटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.