कृष्ण नगर तांडा या गावात मीनाक्षी दगडू चव्हाण वय १८ ही तरुणी कुटुंबासह आपल्या घरी होती. दरम्यान ही तरुणी दिनांक ३० ऑगस्ट रोजी आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुणी कुठेच मिळून न आल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.