सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका ४० वर्षीय महिलेने उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचं नाव आहे. हजारे यांचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुका अग्रणी धुळगाव हे असून ते सध्या नोकरी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे राहत आहेत. घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार अनिता आपल्या पतीसोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होते. अंकली पुलावर पोचल्यावर फोन आल्याने