वादात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून दाजीने महिन्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेत धमकी दिल्याचा प्रकार चुंचाळे शिवारात घडला.फिर्यादी शीतल अनिल अंबुरे व आरोपी संदीप भीमराव चव्हाण हे एकमेकांचे नातेवाईक आहे. फिर्यादीचे पती अनिल अंबुरे हे फिर्यादीची नणंद ज्योती चव्हाण व नंदोई संदीप चव्हाण यांच्यात होणारे कौटुंबिक वाद टाळण्यासाठी चव्हाण दाम्पत्याची समजूत काढत असत;पण फिर्यादीचे नंदोई संदीप चव्हाण यांनी याचा राग मनात धरून मित्राच्या मदतीने मेव्हणा अनिल अंबुरे यांचे अपहरण केले.