ठाणे महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमाची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास सांगितल आहे. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली असून परिस्थिती दाखवली आहे तसेच महापालिकेवर टीका केली आहे.