Download Now Banner

This browser does not support the video element.

मुसळधार पावसाने फळ पिकांचे मोठे नुकसान झाले, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी #Jansamasya

Beed, Beed | Jun 3, 2025
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, संत्री, टोमॅटो यांसारख्या फळ व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी पिकं पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे श्रम वाया गेले आहेत. या अनिश्चित हवामानामुळे शेती व्यवसायावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाहणी करताना व्यक्त केले की, हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा असून, त्यामुळे पिकांची मुळे कुजली आहेत, झाडे आडवी झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us