पुणे येथे १ सप्टेंबर पासून होऊ घातलेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या तिन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थिनी सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शृती कामतवार, साक्षी मशाखेत्री व शालीनी खिरडकर अशी या निवड करण्यात आलेल्या विद्यार्थीनिंची नावे आहेत.महाविद्यालयातर्फे सदर विद्यार्थीनिंचे अभिनंदन करण्यात आले असुन त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.