चिपळूण खडपोली येथे पुलाला अतिवृष्टीमुळे तडा जाऊन वाहतूक बंद झाली आहे. आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी या दुर्घटनेची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला. पुलामुळे स्थानिक नागरिक, उद्योग आणि MIDCतील उद्योजकांना होणारा त्रास तात्काळ कमी व्हावा यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश ना. उदय सामंत ह्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला दिले