जळगाव शहरातील रामानंद नगर येथील गिरणा पाण्याची टाकीजवळ दारू पिण्याच्या जागेवरून वाद झाल्याने मुलाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.