जिल्ह्यात मागील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीपातील पिकांसहीत फळबागा व भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र याबाबत राज्यसरकार कुठलेही ठोस पाऊल उचलतांना दिसत नसल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई सह विविध मागण्यांसाठी रूमनं मोर्चा काढला.