आज ३१ जुलै गुरुवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवन परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, पिक विमा योजनेतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि इतर महत्त्वाच्या शेतीविषयक समस्यांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली..