पर्यावरण वाचले तर संस्कृती आणि संस्कार टिकतील या संकल्पनेला वास्तवात उतरवत जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदर्श ग्राम कळमना येथे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त इको-फ्रेंडली गणेश विसर्जन आज दि 2 सप्टेंबर ला 12 वाजता करण्यात आले. कळमना ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गावात विशेष विसर्जन कुंड उभारण्यात आले. यामध्ये संपूर्ण कळमना ग्रामस्थांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले.