जिल्हाधिकारी जालना आणि अप्पर जिल्हाधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 26.04.2025 रोजी तहसीलदार घनसावंगी व त्यांचे पथक अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोदावरी नदीच्या काठी गस्तीवर असताना मौजे राजाटाकळी येथील वीट भट्टीच्या मागे दोन हायवा वाळूने भरलेले असल्याचे आढळून आले .