गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला सत्तेत असलेल्या सरकारने एस.टी. आरक्षणापासून वंचित ठेवून धनगर समाजाचे भरून न निघणारे नुकसान केले आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये धनगर समाजाचे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आंदोलन चालू आहेत तरीही याची दखल सरकार घेत नाही यामुळे 20 सप्टेंबर रोजी धाराशिव शहराजवळील हातलादेवी तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे अशा प्रकारचे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने आज दि.19 सप्टेंबर रोजी दु.3 वा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले